शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मलनिस्सारण केंद्रात गुदमरुन अभियंत्यासह दोघे ठार-सांगलीत घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:24 IST

महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे अभियंत्यासह दोघे गुदमरुन ठार झाले. कोल्हापूर रस्त्यावरील भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर कुस्ती

ठळक मुद्देपहेलवानांच्या प्रसंगावधानामुळे दोघे बचावले

सांगली : महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे अभियंत्यासह दोघे गुदमरुन ठार झाले. कोल्हापूर रस्त्यावरील भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर कुस्ती आखाड्याजवळ शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. आखाड्यातील पहेलवानांच्या प्रसंगावधानामुळे दोन कामगारांना वाचविण्यात यश आले आहे.

अभियंता उमाकांत प्रभाकर देशपांडे (वय ५०, रा. साईशीतल भवन, फ्लॅट क्रमांक ४, पत्रकारनगरजवळ, सांगली) व विठ्ठल शामलिंग शेरेकर (४५, हनुमाननगर, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. संजय सदाशिव कोथमिरे (३०, कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व संजय सदाशिव माळी (२४, कवलापूर, ता. मिरज) अशी बचावलेल्या कामगारांची नावे आहेत. विषारी वायूमुळे ते गुदमरुन बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जोतिरामदादा कुस्ती आखाड्याजवळ महापालिकेच्या ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्र आहे. या योनजेचा पुण्यातील अ‍ॅक्वाटेक शत प्रा. लि. या कंपनीस ठेका देण्यात आला आहे. योजनेच्या प्रकल्पातील २५ ते ३० फूट इंटकवेलची (विहिरीची) शनिवारी स्वच्छता करायची होती. यासाठी विठ्ठल शेरेकर यांनी विहिरीचे झाकण उघडले. त्यावेळी विषारी वायू बाहेर पडल्याने शेरेकर बेशुद्ध होऊन विहिरीत पडले. हा प्रकार पाहून देशपांडे त्यांना वाचविण्यासाठी विहरीत उतरले. पण एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात गुदमरुन त्यांचाही जागीच मृत्यू झाला. केंद्रातील संजय कोथमिरे व संजय माळी हेही या दोघांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरत होते. तेवढ्यात आखाड्यातील पेहेलवानांनी धाव घेतली. तोपर्यंत कोथमिरे व माळी बेशुद्ध पडले होते. पेहेलवानांनी या चौघांना बाहेर काढून उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देशपांडे व शेरेकर यांना मृत घोषित केले. कोथमिरे व माळी यांना अतिदक्षता विभागात हलविले.अभियंत्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह अनेक नगरसेवकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.कार्यक्रम रद्दमहापालिकेच्यावतीने रविवारी सत्तर एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता; पण या घटनेमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर हारुण शिकलगार यांनी दिली.पुण्यातून बदली अन् सांगलीत मृत्यूअ‍ॅक्वाटेक शत प्रा. लि. या कंपनीत देशपांडे पुण्यात नोकरी करीत होते. तीन आठवड्यांपूर्वी कंपनीने त्यांची सांगलीत बदली केली होती. त्यांच्याकडे महापालिकेच्या ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्राच्या कामाची जबाबदारी दिली होती; पण कामगाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचाही बळी गेला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.भरपाई द्यावी!मृत देशपांडे व शेरेकर यांना महापालिकेने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी महापालिका कामगार सभेने केली आहे. हे काम करताना आवश्यक खबरदारी घेण्यासाठी साधनसामग्री पुरविण्यात आली नाही. शासनाच्या नियमावलींची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे ही घटना घडली. पालिकेने दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना तातडीने भरपाई द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सेवेत घ्यावे, अशी मागणी केली आहे.कंपनीला जबाबदार धरणार : खेबूडकरमहापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुदैवी आहे. पहेलवानांच्या प्रसंगावधानामुळे दोन कामगारांना वाचविण्यात यश आले. या पहेलवानांचा पालिकेतर्फे १५ आॅगस्टला सत्कार केला जाईल. तसेच ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्राच्या कामाचा ठेका ठाण्यातील एसएमसी या कंपनीला दिला होता; पण त्यांनी पुढे अन्य कंपनीला ठेका दिला असेल, तर याची काहीच कल्पना नाही. मात्र आम्ही या घटनेला ठाण्याच्या कंपनीलाच जबाबदार धरणार आहोत.

 

 कोल्हापूर रोडवरील याच इंटकवेलमध्ये शनिवारी दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला.मलनिस्सारणाच्या विहिरीत दोघांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर याठिकाणी गर्दी झाली होती.

 

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू